मोदी सरकारने 14 पिकांच्या हमीभावात केली वाढ; धानासह कापसाला मिळणार इतका भाव...

Update: 2024-06-20 10:21 GMT

शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यात शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) मंजूर केली आहे.२०२४-२५ साठी १४ खरीप पीकांची एमएमसी वाढवण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. वैष्णव यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निर्णयानंतर धानाला मागील आधारभूत किमतीत वाढ करुन २३०० रूपये क्विंटल भाव दिला जाणार आहे. धानाच्या किंमतीत १७० रूपयाची वाढ करण्यात आली आहे.

कापसाच्या एमएसपीत तब्ब्ल ५०० रूपयाची वाढ करण्यात आली आहे.

आता कापसाचा नवीन दर ७ हजार ५२१ रूपये आणि ७ हजार १२१ रूपये प्रतिक्विंटल असणार आहे.

कोणत्या पिकाला किती आधारभूत किंमत किती -

ज्वारी ३ हजार ३७१ रूपये, मूग ८ हजार ६८२, मका २ हजार २२५ रूपये, तूर ७ हजार ५५० रूपये, मूग ८ हजार ६८२ रूपये, नाचणी ४ हजार ९० रूपये, उडीद ७ हजार ४०० रूपये, बाजरी २ हजार ६२५ रूपये, सुर्यफूल ७ हजार २८० रूपये, भूईमूग ६ हजार ७८३ रूपये, सोयाबीन ४ हजार ८९२ रूपये प्रतिक्विंटल असा भाव जाहीर करण्यात आला आहे.

देशात शेतमालासाठी २ लाख टनाचं स्टोरेज तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांना पंतप्रधान झाले शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावात दुप्पट वाढ करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होत हमीभाव वाढवले मात्र अल्प प्रमाणात वाढवले असल्याच शेतकऱ्यांच म्हणणं आहे कारण आता बियाणे रासायनिक खत मजुरी ही शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे. उत्तन्न आणि शेत मालाच्या हमी भावापेक्षा खर्चच जास्त आहे त्यातुलनेत केंद्राने वाढवलेला हवीभाव तटपुंजा आहे अश्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत..

Tags:    

Similar News