"मतदानापूर्वी दिलेली 'टोकन' आश्वासने" आंबेडकरांची महायुतीवर टीका

Update: 2024-10-11 10:35 GMT

प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केले की, महायुती ओबीसी, आदिवासी आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजनांचा वर्षाव करत आहे. परंतु गेल्या अडीच वर्षांपासून या समाजांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

आंबेडकर यांचे म्हणणे आहे की, मतदानाच्या आधी दिलेली 'टोकन' आश्वासने फक्त मतांवर लक्ष केंद्रित करतात आणि खरे कल्याण दर्शवत नाहीत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाची आठवण करून दिली, ज्याने उपेक्षित समाजाच्या वास्तविक आणि दीर्घकालीन उपायांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आचारसंहितेपूर्वीच्या या निर्णयांमध्ये विविध सामाजिक घटकांना लाभ देणारे उपाय समाविष्ट आहेत ज्यांना आंबेडकर 'टोकन' असे म्हणत आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेले शासन निर्णय;

१ ऑक्टोबर: १४८ शासन निर्णय

२ ऑक्टोबर: शासकीय सुट्टी जाहीर

३ ऑक्टोबर: २०३ शासन निर्णय

४ ऑक्टोबर: १८८ शासन निर्णय

५ ऑक्टोबर: २ शासन निर्णय

६ ऑक्टोबर: शासकीय सुट्टी जाहीर

७ ऑक्टोबर: २०९ शासन निर्णय

८ ऑक्टोबर: १५० शासन निर्णय

९ ऑक्टोबर: १९७ शासन निर्णय

१० ऑक्टोबर: १९४ शासन निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या महिन्यात घेतलेल्या निर्णयांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

२३ सप्टेंबर: 24 निर्णय

३० सप्टेंबर: 38 निर्णय

४ ऑक्टोबर: 32 निर्णय

१० ऑक्टोबर: 38 निर्णय

या निर्णयांमुळे वित्त विभागासमोर निधीच्या व्यवस्थापनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. सरकारचा हा निर्णयांमागचा मुख्य उद्देश विविध समाज घटकांना निवडणुकीच्या काळात खुश करणे आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे असून आंबेडकर यांनी या निर्णयावर टीका केली आहे. आंबेडकरांनी मतदारांना इशारा दिला आहे की, शेवटच्या मिनिटांच्या 'हँडआउट्स'च्या फसव्यातून सावध राहावे, आणि खरा बदल घडवण्यासाठी मंतदारांच्या हातात ताकद असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

Tags:    

Similar News