मेल्यावरही संपत नाही आदिवासींचा वनवास, तुडुंब नदीतून न्यावी लागली अंत्ययात्रा

Update: 2024-08-02 13:40 GMT

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असणाऱ्या अनेक आदिवासी वाड्यांना रस्ता नाही. पिरकटवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. धावणी नदीवर पूल नसल्याने येथील आदिवासींना या महिलेची अंत्ययात्रा भरलेल्या नदीतून न्यावी लागली. याच परिसरातील आरकसवाडी, पिरकटवाडी, उंबरणेवाडी या आदिवासी वाड्यांना जायचा रस्ता उपलब्ध नाही. जिवंतपणी या परिसरातील आदिवासींना नागरी सुविधांच्या अभावामुळे अनेक त्रास सहन करावा लागतो. या समस्या मेल्यावरदेखील त्यांची पाठ सोडत नाहीत हे या घटनेवरून अधोरेखीत होत आहे.

Full View

Tags:    

Similar News