एमपीएससी उत्तीर्ण अभियंत्यांचे पुन्हा उपोषण

Update: 2023-11-07 04:41 GMT

‘एमपीएससी’ म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०२०’ उत्तीर्ण होऊन शिफारस झालेले उमेदवार दीड वर्षांनंतरही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत. दोनदा आंदोलन, उपोषण करूनही या उमेदवारांना अद्यापही नियुक्तिपत्र मिळालेले नसल्याने पुन्हा एकदा उपोण करण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे या उमेदवारांना नियुक्तिपत्र अद्याप देण्यात आलेले नाही. सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना (एसईबीसी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून लाभ देण्याचा शासन निर्णय रद्द झाल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. परंतु ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकूण २१ जागांबाबत न्यायालयात वाद प्रलंबित असताना इतर प्रवर्गातील १९६ उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तिपत्र देणे शक्य असूनही ते देण्यास राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्याकडून सातत्याने दिरंगाई केली जात असल्याने उपोषणकर्ते एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Tags:    

Similar News