#MarathaReservation मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8:30 वाजता जनतेला संबोधित करणार

Update: 2021-05-05 13:17 GMT

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने दिलेले मराठा आरक्षण आज अवैध ठरवलं. त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री 8:30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण अवैध ठरवल्यानंतर मुंबई सहित जालना, अहमदनगर, सांगली, सोलापुर, परभणी, पंढरपूर या ठिकाणी विरोध केला जात आहे. काही ठिकाणी लोकांनी मुंडन केलं तर काहींनी रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला आहे.

त्यामुळं मुख्यमंत्री आता काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Tags:    

Similar News