Ground Report : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाची दूरवस्था
famous poet bahinabai chaudhari's memorial is in bad condition in jalgaon;
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शाळेत न जाताही जीवनाचे तत्वज्ञान आपल्या सोप्या काव्यातून जगासमोर मांडले..अशा या महान कवयित्रीची १४२वी जयंती साजरी होते आहे. त्यांचे अजरामर काव्य, त्यांचा जीवन संघर्ष नव्या पिढी समोर यावा यासाठी बहिणाबाई यांचे माहेर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील असोदा या गावी भव्य असे स्मारक उभारण्याचे काम सुरू झाले. पण सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे स्मारक एक खंडहर बनले आहे.
2013-14 मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर सरकारं आली गेली मात्र स्मारकाचे काम अपूर्णच राहीले. बहिणाबाईंच्या वंशज तसेच स्मारक समितीने नव्या सरकारने तरी बहिणाबाईंचं स्मारक पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.