नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडगोळी देशासाठी घातक आहे. या जोडगोळीने पाच वर्षांत जेवढं नुकसान केलंय, ही जोडगोळी पुन्हा सत्तेत आली तर देशात निवडणूकाच बंद करतील. जगणं मुष्कील करतील.
या दोघांनी नोटबंदी केली. यांना माहित होतं, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभर जमीनी विकत घेऊन ठेवल्या. नोटबंदीच्या महिन्याभरात रेड्डी नावाच्या माणसाच्या घरात 33 कोटी रूपये सापडतात मग आता देशात छापल्यापेक्षा जास्त नोटा आहेत हा गोंधळ घातला कोणी.. हा गोंधळ शाहा आणि मोदी यांनी घातलाय.. असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवलाय.