Lok Sabha elections 2019 : 2004 विसरु नका, सोनिया गांधींचा मोदींना इशारा

Update: 2019-04-11 10:57 GMT

आज सोनिया गांधी यांनी रायबरेली इथं लोकसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी निवडणूका संदर्भात सुचक वक्तव्य करत मोदींना इशारा दिला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे वाटत असेल की ते अजिंक्य आहेत तर तो त्यांचा गैरसमज आहे. २००४ मध्ये वाजपेयींनाही असेच वाटत होते की ते अजिंक्य आहेत. मात्र, आम्हीच निवडून आलो’

असं म्हणत देशात 2004 प्रमाणे जनता भाजपला नाकारणार असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे देशात खरंच 2004 ची परिस्थिती निर्माण होणार का? याचे उत्तर येत्या 23 मेला जनता नक्कीच देईल. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते.

Similar News