पकोडे तळण्यासाठी आम्ही पदव्या घेतल्या काय ?

Update: 2019-04-17 18:08 GMT

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून देशाच्या सुरक्षेच्या मुद्दयांना पुढे करायला सुरूवात केलीय. तर दुसरीकडे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारच्या मुद्द्यांना खोडून काढायला सुरूवात केलीय. मात्र, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांचं प्रतिबिंब राजकीय पक्षांच्या अजेेंड्यावरूनच गायब झाल्याचं चित्र सध्या बुलडाणा मतदारसंघात दिसतंय. नवमतदारांना मात्र त्यांच्या भवितव्याची चिंता आतापासूनच वाटायला लागलीय. तर नवउद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवणार कोण, हा प्रश्न भेडसावतोय. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसणार कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’मधून

Full View

Similar News