पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष झाल्यानंतर एनडीएमधून बाहेर पडलेल्या राजू शेट्टींनी राज्यभरात आंदोलनं केली. सध्या राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील झालाय. सध्या प्रचारातून शेट्टी हे शेतकऱ्यांचेच प्रश्न उपस्थित करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रस्थापितांच्या विरोधात बोलणं हेच आमच्या चळवळीचं काम आहे आणि ते यापुढेही सुरूच राहिल, असं मत राजू शेट्टींनी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याशी बातचीत करतांना व्यक्त केलंय.