दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातल्या सुमारे २ हजार बांधकाम मजूरांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यातून स्थलांतराचं प्रमाणही वाढलंय. राज्य सरकारनं वाळू उपशावर घातलेल्या निर्बंधांमुळं ही वेळ आल्याचं मजूरांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी आणि परिसरातील २ हजार बांधकाम मजूरांचा प्रश्न गंभीर होत चाललाय.