राज्यातील सरकारमध्ये काँग्रेस किती दिवस राहणार? नाना पटोलेंनी मांडली भूमिका

Update: 2021-06-20 09:56 GMT

गेल्या काही दिवसात राज्यात महा विकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. या टीकेला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमका कोणाला टोला लगावला ते स्पष्ट नाही, असे पटोले यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पूर्ण पाच वर्ष राहणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकार अस्थिर असल्याच्या या चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम मिळालेला आहे.

Full View
Tags:    

Similar News