Home > News Update > यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात, उत्सवांवरील निर्बंध उठवले

यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात, उत्सवांवरील निर्बंध उठवले

यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात, उत्सवांवरील निर्बंध उठवले
X

गेले दोन वर्ष कोरोनामुळे उत्सवांवर असलेले निर्बंध आता राज्य सरकारने उठवले आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासह सर्व उत्सव धुमधडाक्यात साजरे होणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडीनिमित्त कायदा व सुव्यवस्था आणि इतर बाबींसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

गेले दोन वर्ष कोरोनामुळे उत्सवांवर असलेले निर्बंध आता राज्य सरकारने उठवले आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासह सर्व उत्सव धुमधडाक्यात साजरे होणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडीनिमित्त कायदा व सुव्यवस्था आणि इतर बाबींसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

बैठकीत उत्सवांसंदर्भात कोणकोणते निर्णय झाले?

गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली असून, आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने साजरे व्हावेत. हे करताना मंडळांनी समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गणेशोत्सव, दही हंडी, मोहर्रम या सणाच्या काळांत राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनांना निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत. गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क नाही. तसेच हमी पत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गणेसोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतूनच सर्व प्रकारचे परवानग्या मिळाल्या पाहिजेत, असे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सव हा सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत. मात्र नियमांचा अवास्तव बाऊ केला जाऊ नये. राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

याचबरोबर गणेश मूर्तीच्या उंचीवरची बंधने उठवली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईत मूर्तीकारांसाठी मूर्तींशाळांसाठी जागा निश्चित करण्यात याव्यात. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात, असेही आदेश त्यांनी दिले. तसेच पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी आणि दही हंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (१४ वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली असून, आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने साजरे व्हावेत. हे करताना मंडळांनी समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गणेशोत्सव, दही हंडी, मोहर्रम या सणाच्या काळांत राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनांना निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत. गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क नाही. तसेच हमी पत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गणेसोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतूनच सर्व प्रकारचे परवानग्या मिळाल्या पाहिजेत, असे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सव हा सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत. मात्र नियमांचा अवास्तव बाऊ केला जाऊ नये. राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

याचबरोबर गणेश मूर्तीच्या उंचीवरची बंधने उठवली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईत मूर्तीकारांसाठी मूर्तींशाळांसाठी जागा निश्चित करण्यात याव्यात. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात, असेही आदेश त्यांनी दिले. तसेच पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी आणि दही हंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (१४ वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Updated : 21 July 2022 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top