शरद पवार आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली होती का? वाचा संजय राऊतांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी भल्यापहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. पण या शपथविधी आधी आदल्या रात्री नेमकं काय घडलं याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे.
X
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी भल्यापहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. पण या शपथविधी आधी आदल्या रात्री नेमकं काय घडलं याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. सामना'च्या रोखठोक या आपल्या स्तंभातून संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापने आधीच्या अनेक घडामोडी सांगितलेल्या आहेत. तसेच
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात त्या रात्री झालेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केलेला आहे. यातील काही अंश पाहूया... नेहरु सेंटरमधळी ठिणगी असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार व माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे तेव्हा आमच्याकडे 170 आहे असे मी सांगितले. तेव्हा 170 आकड्याची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेसचा स्पष्ट होकार आला नव्हता. पण अहमद पटेल यांच्यासारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली व शरद पवार आणि खरगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना ते एवढे संतापलेले मी प्रथमच पाहिले.
ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनी सुचवले. पण खरंतर बैठकीचा नूरच पालटला होता. यानंतर अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून चॅटिंग करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले अजित पवारांचा फोन त्यानंतर स्विच ऑफ झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस - अजित पवार यांचा शपथ विधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला. "तुमचे सरकार बनत नाही, फडणवीस अजित पवार शपथ घेत आहेत. " अजित पवारांनी आणि कुटुंबात फूट पाडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले. मी त्या क्षणीही सांगितले चार वाजेपर्यंत थांबा अजित पवारांसोबत गेलेले परत येतील.
स्वतः अजितदादा गुदमरुन परत येतील. हे यासाठी सांगायचे की पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली व अशाप्रकारचा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधी'चे नाट्य तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे. अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. या काळात दिल्लीत असताना शरद पवार व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळजवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कुठे काय सुरू होते याची अपडेट्स एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतीही डील करण्याच्या मनस्थितीत मला ते दिसले नाहीत. भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरावर ऑफर येत आहेत हे त्यांचे सांगणे होते. "लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही असे असे सांगणार आहे" हे त्यांनी मला सांगितले आणि याच काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले आणि महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या, हे खोटे आहे. मोठे अपघात दुर्दैवाने पहाटे चालक साखरझोपेत असतानाच होतात.