Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांची अडवणूक करणारा शंभू बॉर्डर उघडा कोर्टाचे आदेश..

शेतकऱ्यांची अडवणूक करणारा शंभू बॉर्डर उघडा कोर्टाचे आदेश..

शेतकऱ्यांची अडवणूक करणारा शंभू बॉर्डर उघडा कोर्टाचे आदेश..
X

पिकांच्या हमी भावासाठी MSP दिल्लीत आंदोलन वेळी शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी पंजाब आणि हरियाणा सरकारने शंभू सीमेवर बॅरिकेड्स लावून शील केले होते. शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये यासाठी शंभू सीमा बंद केली होती. उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड्स एका आठवड्याच्या आत हटवण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने म्हटले की शेतकऱ्यांचे परराज्यात जाणे रोखता येणार नाही

शंभू बॉर्डर पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील ही जीवनरेखा आहे. शंभू सीमेवर शांतता आहे. शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारकडे आहे, त्यामुळे त्यांना दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी. वास्तविक, एमएसपीच्या कायदेशीर हमीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने दिल्लीवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यांना रोखण्यासाठी हरियाणा सरकारने अंबाला-नवी दिल्ली महामार्गावर मोठे बॅरिकेड्स लावले आहेत.

न्यायमूर्ती जीएस संधावालिया आणि न्यायमूर्ती विकास बहल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारनेआदेश दिले आहेत की आता जागे व्हावे, सीमा कायमस्वरूपी बंद करता येत नाहीत.

Updated : 11 July 2024 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top